दादर संस्कार वर्ग
THE REAL VALUE OF LIFE

श्रीगजाननाच्या कृपेने, विद्येचे आराध्यदैवत श्रीसरस्वतीमातेच्या आशिर्वादाने
आणि सन्माननीय श्री. शरदजी उपाध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली
“दादर संस्कार वर्गा”ला येत्या २१ मे रोजी “पाच वर्षे” पुर्ण होत आहेत.
पालकांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या चार वर्षांत दादर संस्कार वर्गात बालमित्र/विद्यार्थी सहभागी झाल्यामुळे तुमचा आमचा आनंद द्विगुणित झाला.
प्रारंभी फक्त ४-५ बालगोपाळ सहभागी झाले आणि नंतर मात्र बालमित्रांचा आपल्या संस्कार वर्गाकडे ओढा वाढला!
आणि खरंच ! आपल्या संस्कार वर्गाला ४ वर्ग सुरू करण्यात यश प्राप्त झाले .
आॅनलाईन वर्गाला सुध्दा मुंबई पुणे, नांदेड गोवा,उरळीकांचन, चिपळूण…
एवढेच नव्हे तर परदेशात अमेरिका, हाॅन्गकाॅन्ग अन्यत्र उत्तम प्रतिसाद मिळाला.
संस्कारवर्ग ३ ते १४ वयोगटातील मुला – मुलींचा
सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.
आजपर्यंत साधारणतः ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या आमच्या उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्यक्षात नव्या पिढीवर संस्कार घडणे या उपक्रमामुळे शक्य झाले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही मुलां मुलींसाठी वर्ग Online चालू राहिला आणि मुलांनीही न थांबता याचा लाभ घेतला.
प्रत्येक मुल फक्त अभ्यासातच हुशार असेल अस नाही. काहींनी सुंदर चित्रे काढली काहींना छान छान गोष्टी सांगणे शक्य झाले,काही अगदी छान योगा करू लागले तर काहींनी अगदी अर्थासकट मोठे मोठे श्लोकही पाठ केले. इतकंच नाही तर छान छान नाट्यछट्या करण्यातही रमून गेले.स्वतः मधील कलागुणांचा त्यांना शोध लागला. त्या गोष्टी आवडीने कराव्याशा त्यांना वाटू लागल्या.मुलांनी श्लोकपठण करून त्याचा अर्थ समजून घ्यावा.


संपुर्ण जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना मुले सामान्यज्ञानात (जनरल नाॅलेज)मध्ये प्रगत विचारांची असावित.जेणेकरून शालेय अभ्यासक्रमात याचा निश्चितच उपयोग होईल असेच उपक्रम आयोजित करण्यात यावेत,अशी आमची संकल्पना नेहमीच असते. त्यादृष्टीने उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.आजची मुले हीच देशाची संपत्ती म्हणजेच भावी आदर्श नागरिक असणार आहेत. मुलांनी वडिलधारी व्यक्तिमत्त्वांचा मान राखावा, नम्रता अंगीकारणे तसेच संस्कारक्षम व्हावे यादृष्टीने उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. म्हणतात ना ” विद्या विनयेन शोभते” !
आपला भारत देश “सुजलाम सुफलाम” “आदर्श” नागरिकच घडवू शकतात !
हीच प्रामाणिक भावना ठेवून संस्कार वर्गातील विविध अभ्यासक्रम, कार्यक्रमाद्वारे मुलांना आदर्शवत उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. “देशाचे उत्तम, आदर्श नागरिक व्हा” !
हाच दादर संस्कार वर्गाचा ध्यास! आणि हाच संदेश!!